मिरज ही आरोग्य पंढरी म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात परिचित आहे शहरामध्ये शेकडो च्या वर रुग्णालये विविध उपचारासाठी प्रसिद्ध आहेत तसेच काही रुग्णालये दुर्मिळ आजरांवर उपचारासाठी प्रसिद्ध आहेत त्यातलेच एक रुग्णालय म्हणजे अश्विनी प्रसाद. स्टेशन रस्त्यावर असलेले या रुग्णालयाने आपली वैद्यकीय परंपरा कायम ठेवली असून आता या रुग्णालयाची चौथी पिढी डॉ राहुल शिशिर गोसावी यांच्या रूपाने रुग्ण सेवेत दाखल झाली असून गेली दहा वर्षे कान नाक घशावरील आजारावर यशस्वी उपचार ते करत आहेत त्याच प्रमाणे अगदी दुर्मिळ असणारे त्वचें वरील ऍलर्जी ची तपासणी ते अत्याधुनिक यंत्रणेच्या सहाय्याने करत आहेत. या संदर्भात आमच्या प्रतिनिधी नी डॉ राहुल गोसावी यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितले, “प्रथम आपल्या वृत्तवाहिनीस शुभेच्छा आमच्या या रुग्णालयाचा गौरवशाली आणी वैभवशाली इतिहास संपूर्ण महाराष्ट्रासह विदेशातही प्रसिद्ध आहे. आमच्याकडे होणारे उपचार हे रुग्णासाठी वरदान ठरणारे आहेत माझे आजोबा आदरणीय डॉ डी के तथा दत्तात्रय गोसावी हे तत्कालीन खूप मोठे तज्ञ डॉक्टर लोकांपैकी एक होते माझी आजी ही उत्तम प्रसूती तज्ञ म्हणून परिचित होत्या त्याचप्रमाणे माझे वडील डॉ शिशिर गोसावी हे कान नाक घशावरील तज्ञ सर्जन आहेत तसेच आमच्या मातोश्री डॉ अमिता गोसावी याही उत्तम प्रसूती तज्ञ तर आहेतच त्याचप्रमाणे त्यांनी या क्षेत्रपलीकडे जाऊन एक कवयत्री म्हणून आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे त्या एक चांगल्या साहित्यिक आहेत.
आज आमच्या रुग्णालयामध्ये अधुनिक पद्धतीने नाक आणी घशा संबंधित विविध उपचारांसाठी आवश्यक असणाऱ्या ऍलर्जी च्या चाचण्या आमच्या अश्विनी प्रसाद रुग्णालयामध्ये आता आपण करू शकतो मिरज मध्ये माझ्या मते अशा प्रकारच्या चाचण्या अश्विनी प्रसाद रुग्णालयामध्ये आम्ही प्रथम सुरु केल्या आहेत गेली दहा वर्षे या चाचण्या सुरु आहेत आज तागायत असंख्य रुग्णांनी याचा लाभ घेत आहेत. आजारपण आणी संसर्ग यांच्याशी लढा देणारे अतिशय महत्वपूर्ण काम आपल्या शरीरातील टॉन्सिल्स आणी एडेनॉईड्स हे करीत असतात हे लसिका उती चें मान्सल भाग असतात. घशाच्या दोन्ही बाजूला प्रत्येक स्त्री पुरुषाला टॉन्सिल असतात. आणी एडेनॉईड्स हे घशाच्या मागील भागात अर्थात नाकामध्ये असतात. आपण ज्यावेळी श्वास घेतो त्यावेळी जिवाणू आणी विषाणू यांना रोखून ठेवण्याचे काम ते करत असतात. काही वेळा हे टॉन्सिल्स आणी एडेनॉईड्स काही रुग्णांमध्ये प्रमाणाच्या जास्त वाढतात त्यावेळी शास्त्रक्रिया करुन ते काढणे आवश्यक ठरते. ज्यावेळी एखाद्या रुग्णास नाकाचा त्रास सुरु होतो जसे की सारखी सर्दी होणे ही सर्दी एखाद्या एलर्जी मुळे सुद्धा होऊ शकते धूळ आणी वातावरणात बदलामुळे तर या एलर्जी च्या संबंधित तपासण्या आता आपल्या मिरज मध्ये आम्ही रुग्णांसाठी सुरु केल्या आहेत यामुळे रुग्णांना दूर गावी पुणे मुंबई ला महागड्या रुग्णालयात जायची गरज नाही. यासाठी आमच्या कडे मी स्वतः या तपासण्या करतो आहे तसेच आपल्या कडे तज्ञ डॉक्टर्स ची टीम रुग्णांच्या सेवेसाठी तत्पर आहे.











