सांगली जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले तब्बल ११ हजार १४२ विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची या गुढीपाडव्याला नोंद झाली कसबे डिग्रज इथे एका शाळेमध्ये जिल्हा परिषदेचे सी इ ओ विशाल नरवडे यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले. पुढील आठ दिवस हि प्रवेश प्रक्रिया सुरु राहणार असल्याचे यावेळी विशाल नरवडे यांनी सांगितले. या प्रवेशाचा जास्ती जास्त पालकांनी लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांनी केले. गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात होते. त्यामुळे गुढीपाडव्याला शिक्षण विभाग आणि शिक्षकांकडून प्रवेश प्रक्रियेसाठी आणि विद्यार्थ्यांच्या स्वागताची जोरदार तयारी करण्यात आली होती. अनेक पालकांनी आपल्या पाल्याचा प्रवेश जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये घेण्याकडे पसंती दाखवली. काही शाळांमधून प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना फेटे बांधून, गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. काही शाळांमधून नव्याने नियुक्त जिल्हा परिषद सदस्य आवर्जून उपस्थित होते त्यांनीही या विद्यार्थ्यांचे स्वागत केले. शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांनी जिल्ह्यातील काही शाळांमध्ये भेटी देऊन प्रवेश प्रक्रियेवर लक्ष ठेवले. जिल्ह्यंडे दहा तालुक्यांमधून सुमारे १८ हजार विद्यार्थी प्रवेशास पात्र असल्याचे यावेळी शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांनी सांगितले त्यापैकी तब्बल ११ हजार विद्यार्थ्यी वर्गाने जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये प्रवेशासाठी अनुकूलता दाखवत या शाळांवरील विश्वास कायम ठेवला आहे. सर्वाधिक विद्यार्थी प्रवेश खानापूर तालुक्यातील शाळांमध्ये झाला असून सर्वात कमी प्रवेश वाळवा तालुक्यातील शाळांमध्ये नोंदवला गेलाय. जिल्हा परिषदेच्या वतीने राबण्यात येणाऱ्या मॉडर्न स्कुल चा फायदा यावेळी प्रवेश प्रक्रियेवर चांगला झाल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्येक शाळांमधून भौतिक सुविधांना प्राधान्य देत सुधारणा करण्यात आली असून गुणवत्ता वाढीसाठी उपक्रम राबवण्यात आले आहेत. शाळांमधून डिजिटल क्लासरूम तसेच शाळांमधील वर्गांचे रुपडे पालटल्याने आता विद्यार्थ्यांना या शाळांमधील शिक्षण हवे हवेसे वाटत आहे.








