आजरा (प्रतिनिधी) : आजरा नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्रमांक ९ मधील सुभाष गल्ली येथे काँक्रिट रस्त्याच्या कामाचा शुभारंभ उत्साहात पार पडला. हे काम पालकमंत्री Prakash Abitkar यांच्या विकास निधीतून मंजूर झाले असून, परिसरातील नागरिकांची अनेक वर्षांची प्रतीक्षा संपुष्टात आली आहे.
या कामाचा शुभारंभ माजी पंचायत समिती सदस्य तथा शहीद अब्दुल हमीद सोसायटीचे चेअरमन अबूताहेर तकीलदार यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. यावेळी त्यांनी प्रभागाच्या विकासासाठी नेहमीच पाठीशी राहण्याचे आश्वासन दिले.
नगरसेविका रेश्मा बुडडेखान यांनी यावेळी बोलताना प्रभागातील प्रलंबित प्रश्न सोडवण्याचा निर्धार व्यक्त केला. “मागील काळात प्रभागाला मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवण्यात आले होते. मात्र, आता जास्तीत जास्त निधी आणून सर्व समस्या मार्गी लावणार,” असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमास दिवाकर नलवडे (माजी अध्यक्ष, व्यापारी संघटना), राजू कुलकर्णी, अब्दुल माणगावकर, राहुल कोरे, दस्तगीर मकानदार, रमेश कारेकर, जबीऊल्ला फकीर, राकेश नलवडे, राजू विभुते यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.









