• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कोकणातील आंबा-काजू शेतकऱ्यांसाठी विशेष मदत पॅकेज जाहीर

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
March 26, 2026
in Blog
0
कोकणातील आंबा-काजू शेतकऱ्यांसाठी विशेष मदत पॅकेज जाहीर
0
SHARES
18
VIEWS
Ad 1

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत घोषणा

कणकवली (प्रतिनिधी) : कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारी महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली आहे. अनियमित हवामान बदलामुळे झालेल्या मोठ्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत विशेष मदत पॅकेज जाहीर केले.

RelatedPosts

कडेगावात गगनचुंबी ताबूतांच्या भेटींचा सोहळा उत्साहात संपन्न

तुकाराम मुंढे यांच्या समर्थनार्थ कडेगावात आंदोलन; बदली न करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

निमसोड येथे स्मार्ट मीटर बसवण्यासाठी सक्ती व दमदाटी केल्याची तक्रार

या पॅकेजनुसार, पीक विमा घेतलेल्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टर ₹४२,०००, तर विमा नसलेल्या शेतकऱ्यांना ₹२२,००० इतकी आर्थिक मदत देण्यात येणार आहे.

कोकणातील आंबा आणि काजू पिकांना यंदा तापमानातील चढ-उतार, अवेळी पाऊस, गारपीट आणि वाऱ्यामुळे मोठा फटका बसला आहे. फळधारणेत झालेल्या घटेमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले होते. या पार्श्वभूमीवर शासनाने तातडीने निर्णय घेतला आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या आग्रही मागणीनंतर हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, १७ मार्च २०२६ रोजी कोकणातील लोकप्रतिनिधींशी बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर कृषी विभाग तसेच डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ यांच्याकडून अहवाल मागवण्यात आला असून त्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

नुकसानाचा आढावा:

  • कोकणातील पालघर, ठाणे, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये आंबा पिकाखाली १,२४,५७१ हेक्टर क्षेत्र
  • यापैकी ८०,४१८ शेतकऱ्यांनी विमा घेतला
  • सुमारे १५५ महसूल मंडळांमध्ये नुकसानभरपाई देय

आंबा पिकासाठी:

  • कमी तापमानामुळे: ₹६,०७१ ते ₹३४,००० प्रति हेक्टर
  • जास्त तापमानामुळे: ₹१७,१७१ ते ₹६८,००० प्रति हेक्टर
  • विमा संरक्षित रक्कम: ₹२.२७ लाख प्रति हेक्टर

काजू पिकासाठी:

  • क्षेत्र: १,७५,१४० हेक्टर
  • नुकसानग्रस्त मंडळे: सुमारे १५०
  • नुकसानभरपाई: ₹१६,८०० ते ₹४२,००० प्रति हेक्टर
  • विमा संरक्षित रक्कम: ₹१.६० लाख प्रति हेक्टर

महत्त्वाचे म्हणजे, पीक विमा न घेतलेल्या शेतकऱ्यांनाही शासन मदत करणार आहे. यासाठी तातडीने पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अंतिम अहवालानंतर शेतकऱ्यांना त्वरित मदत वितरित केली जाणार आहे.

या निर्णयामुळे सिंधुदुर्गसह संपूर्ण कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून शासनाच्या या पावलाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.

Previous Post

शहीद बाबुराव शेडमाके जयंती उत्साहात साजरी

Next Post

नांदगाव खंडेश्वरमध्ये ईद-उल-फित्र उत्साहात साजरी

Related Posts

Blog

कडेगावात गगनचुंबी ताबूतांच्या भेटींचा सोहळा उत्साहात संपन्न

June 26, 2026
44
Blog

तुकाराम मुंढे यांच्या समर्थनार्थ कडेगावात आंदोलन; बदली न करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

June 26, 2026
33
Blog

निमसोड येथे स्मार्ट मीटर बसवण्यासाठी सक्ती व दमदाटी केल्याची तक्रार

June 26, 2026
8
Blog

धैर्यशील कदम यांनी विधान परिषद सदस्य म्हणून घेतली शपथ

June 26, 2026
6
Blog

वडूज नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी रेखाताई माळी यांची बिनविरोध निवड; सत्कार समारंभ उत्साहात

June 26, 2026
39
Blog

खासदार संजय पाटील यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध; गुन्हा दाखल करण्याची मागणी

June 26, 2026
20
Next Post

नांदगाव खंडेश्वरमध्ये ईद-उल-फित्र उत्साहात साजरी

ताज्या बातम्या

कडेगावात गगनचुंबी ताबूतांच्या भेटींचा सोहळा उत्साहात संपन्न

June 26, 2026

तुकाराम मुंढे यांच्या समर्थनार्थ कडेगावात आंदोलन; बदली न करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

June 26, 2026

निमसोड येथे स्मार्ट मीटर बसवण्यासाठी सक्ती व दमदाटी केल्याची तक्रार

June 26, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In