• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कोकणातील आंबा-काजू शेतकऱ्यांसाठी विशेष मदत पॅकेज जाहीर

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
March 26, 2026
in Blog
0
कोकणातील आंबा-काजू शेतकऱ्यांसाठी विशेष मदत पॅकेज जाहीर
0
SHARES
18
VIEWS
Ad 1

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत घोषणा

कणकवली (प्रतिनिधी) : कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारी महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली आहे. अनियमित हवामान बदलामुळे झालेल्या मोठ्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत विशेष मदत पॅकेज जाहीर केले.

RelatedPosts

फलटणमध्ये चायनिज (नरबळी)मांजा खुलेआम विक्री

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

या पॅकेजनुसार, पीक विमा घेतलेल्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टर ₹४२,०००, तर विमा नसलेल्या शेतकऱ्यांना ₹२२,००० इतकी आर्थिक मदत देण्यात येणार आहे.

कोकणातील आंबा आणि काजू पिकांना यंदा तापमानातील चढ-उतार, अवेळी पाऊस, गारपीट आणि वाऱ्यामुळे मोठा फटका बसला आहे. फळधारणेत झालेल्या घटेमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले होते. या पार्श्वभूमीवर शासनाने तातडीने निर्णय घेतला आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या आग्रही मागणीनंतर हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, १७ मार्च २०२६ रोजी कोकणातील लोकप्रतिनिधींशी बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर कृषी विभाग तसेच डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ यांच्याकडून अहवाल मागवण्यात आला असून त्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

नुकसानाचा आढावा:

  • कोकणातील पालघर, ठाणे, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये आंबा पिकाखाली १,२४,५७१ हेक्टर क्षेत्र
  • यापैकी ८०,४१८ शेतकऱ्यांनी विमा घेतला
  • सुमारे १५५ महसूल मंडळांमध्ये नुकसानभरपाई देय

आंबा पिकासाठी:

  • कमी तापमानामुळे: ₹६,०७१ ते ₹३४,००० प्रति हेक्टर
  • जास्त तापमानामुळे: ₹१७,१७१ ते ₹६८,००० प्रति हेक्टर
  • विमा संरक्षित रक्कम: ₹२.२७ लाख प्रति हेक्टर

काजू पिकासाठी:

  • क्षेत्र: १,७५,१४० हेक्टर
  • नुकसानग्रस्त मंडळे: सुमारे १५०
  • नुकसानभरपाई: ₹१६,८०० ते ₹४२,००० प्रति हेक्टर
  • विमा संरक्षित रक्कम: ₹१.६० लाख प्रति हेक्टर

महत्त्वाचे म्हणजे, पीक विमा न घेतलेल्या शेतकऱ्यांनाही शासन मदत करणार आहे. यासाठी तातडीने पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अंतिम अहवालानंतर शेतकऱ्यांना त्वरित मदत वितरित केली जाणार आहे.

या निर्णयामुळे सिंधुदुर्गसह संपूर्ण कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून शासनाच्या या पावलाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.

Previous Post

शहीद बाबुराव शेडमाके जयंती उत्साहात साजरी

Next Post

नांदगाव खंडेश्वरमध्ये ईद-उल-फित्र उत्साहात साजरी

Related Posts

Blog

फलटणमध्ये चायनिज (नरबळी)मांजा खुलेआम विक्री

August 6, 2026
10
Blog

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

August 2, 2026
177
Blog

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

August 2, 2026
35
Blog

चांभुर्डीचे सुपुत्र दत्तात्रय दळवी यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांसमवेत उत्साहात; नव्या ग्रंथालयाचे उद्घाटन

August 2, 2026
53
Blog

उपक्रमशील शिक्षिका मिनाक्षी मोरे यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा दगडवाडीत भावपूर्ण वातावरणात संपन्न

August 2, 2026
14
Blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०६ वी जयंती शिरोळ येथे उत्साहात साजरी

August 2, 2026
97
Next Post

नांदगाव खंडेश्वरमध्ये ईद-उल-फित्र उत्साहात साजरी

ताज्या बातम्या

बेल वृक्षांचे वाटप आणि वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला.

बेल वृक्षांचे वाटप आणि वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला.

August 8, 2026
शहाद्यात राहुरी कृषी विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन बुद्धिबळ स्पर्धा संपन्न; मुलांमध्ये जैनपूर तर मुलींमध्ये कोल्हापूर कृषी महाविद्यालय विजेते.

शहाद्यात राहुरी कृषी विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन बुद्धिबळ स्पर्धा संपन्न; मुलांमध्ये जैनपूर तर मुलींमध्ये कोल्हापूर कृषी महाविद्यालय विजेते.

August 7, 2026
महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेचा शिक्षक मेळावाजव्हारमध्ये उत्साहात संपन्न.

महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेचा शिक्षक मेळावाजव्हारमध्ये उत्साहात संपन्न.

August 7, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In