पारनेर (प्रतिनिधी) : पारनेर तालुक्यात गारपिटीसह झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून कांदा, गहू, टोमॅटो, डाळिंब, कलिंगड यांसह विविध पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
आज आमदार काशिनाथ दाते यांनी पाडळी आळे, अळकुटी, रेणवडी, म्हस्केवाडी आदी गावांमध्ये जाऊन नुकसानग्रस्त शेतीची अधिकाऱ्यांसमवेत प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या.
आमदार दाते यांनी प्रशासनाला तात्काळ पंचनामे पूर्ण करून शेतकऱ्यांना शासनाकडून मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले.
यावेळी आमदार दाते म्हणाले की, “शेतकरी अडचणीत असताना त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे ही माझी जबाबदारी आहे. या संकटकाळात प्रशासन पूर्णतः सतर्क असून आपण सर्वजण सामूहिक प्रयत्नांतून या संकटावर निश्चितपणे मात करू.”
या पाहणी दौऱ्यात जिल्हा कृषी अधिकारी शाम बोराळे, ग्राम महसूल अधिकारी श्रीम. बोटे के. डी., कृषी सहाय्यक गायकवाड, ग्रामविकास अधिकारी आहेर, कृषी अधिकारी कुणाल खोमणे यांच्यासह वसंत थोरात, डॉ. उत्तम थोरात, योगेश थोरात, संग्राम पावडे, रामदास थोरात, भाऊसाहेब डेरे, अशोक डेरे, लक्ष्मण डेरे, खंडू दादा थोरात, खंडू जरारे, बबनराव थोरात, संजीव येवले, दत्तात्रय खामकर, कैलास थोरात, दौलत डेरे, प्रज्योत थोरात, भावेश येवले, स्वराज थोरात, बाबाजी जरारे आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.








