अंदरसुल (प्रतिनिधी) : येवला तालुक्यातील गवंडगाव ग्रामस्थांच्या वतीने खासदार समीर भाऊ भुजबळ यांचा सत्कार करून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न सोडवल्याबद्दल ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले.
राज्याचे अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या सूचनेनुसार परिसरात पिण्याच्या पाण्याची योग्य व्यवस्था करण्यात आली. तसेच खासदार समीर भाऊ भुजबळ यांच्या देखरेखीखाली परिसरातील बंधारे भरून काढण्यात आले, ज्यामुळे भर उन्हाळ्यात पाणीटंचाईचा प्रश्न मोठ्या प्रमाणात कमी झाला.
विशेषतः येवला तालुक्यातील पूर्व भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न प्रभावीपणे सोडवण्यात आल्याने ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
यावेळी गवंडगाव येथील शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. पाणीप्रश्न सुटल्याने गावात आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.











