भारत कवितके मुंबई कांदिवली पश्चिम.
कांदिवली पश्चिम येथील ओम साई सेवा मंडळाच्या मंदिर जिर्णोध्दार सोहळ्याचे विविध सांप्रदायिक कार्यक्रमासह आयोजन करण्यात आले आहे, असे संप्रदाय सचीव रामदास शिंदे यांनी आमचे मुंबई प्रतिनिधी भारत कवितके यांना कळविले आहे.ओम साई सेवा मंडळ,ओम साई एस.आर.ए.सहकारी संस्था,ओम साई सेवा वारकरी संप्रदाय, गणेश उत्सव मंडळ व महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने श्री.गणेश, विठ्ठल, रुक्मिणी,साई मंदिर,व हनुमान मूर्ती जिर्णोद्धार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.डहाणूकर वाडी, मेट्रो स्टेशन जवळ ओम साई सेवा मंडळाने शनिवार दिनांक १८ एप्रिल २०२६ व १९ एप्रिल २०२६ रोजी या दोन दिवसीय मंदिर जिर्णोध्दार सोहळ्यात काकड आरती, श्री गणेश पूजन,कलश स्थापना,हवन, अभिषेक व महापूजा,सुसंगीत भजन स्वर अलंकार, सामुदायिक हरिपाठ, किर्तन, महाप्रसाद, महाआरती, मंदिर उद्घाटन सोहळा, आदी सांप्रदायिक कार्यक्रमासह मान्यवरांचे स्वागत सत्कार कार्यक्रम आयोजित केला आहे.यावेळी उद्घाटक म्हणून खासदार पियुष गोयल (वाणिज्य व उद्योग केंद्रीय मंत्री),भरतशेठ गोगावले (कॅबिनेट मंत्री महाराष्ट्र राज्य), प्रवीण दरेकर ( कॅबिनेट मंत्री महाराष्ट्र राज्य) योगेश कदम (गृहराज्यमंत्री), गोपाळ शेट्टी ( मा.खासदार),सूरज चव्हाण ( शिवसेना सचिव),
आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.मंदिर जिर्णोध्दार सोहळ्याचे आयोजक रवि मुंढे (अध्यक्ष), अभिषेक शिर्के (मंडळ सचिव), विलास पाटील (मंडळ खजिनदार), अनंत साळवी ( सोसायटी सचिव), अरविंद साळुंखे (सोसायटी खजिनदार), रवींद्र देवघरे (सोसायटी उपसचिव), नकुल थरकुडे (संप्रदाय अध्यक्ष), रामदास शिंदे (संप्रदाय सचीव), मनोहर चव्हाण (संप्रदाय खजिनदार) यांनी सर्व भाविकांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे, या प्रसंगी हे.भ.प.राजन निकम, दीपक ( बाळा)तावडे,लालसिंग पुरोहित, दिनेश साळवी, आनंद माईंगडे,किरणशेठ मुके, अनिल सावंत, बाळासाहेब कदम, लतिका अशोक फडतरे, वैशाली राजेश शहा,मिलनभाई शेठ,आर.एस.पी.कन्स्ट्रक्शन या मान्यवरांचे स्वागत सत्कार करण्यात येणार आहेत.









