आदर्श ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित श्री अंबिका माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने इयत्ता दहावीच्या शंभर टक्के निकालाची गौरवशाली परंपरा यंदाही कायम राखली आहे. फेब्रुवारी २०२६ मध्ये झालेल्या एसएससी परीक्षेत विद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला असून विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.
विद्यालयात विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी वर्षभर जादा तासिका, सराव चाचण्या, वैयक्तिक मार्गदर्शन, पालकांशी नियमित संवाद अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. याच सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे दरवर्षी विद्यालयाच्या गुणवत्तेत लक्षणीय वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.


गुणवंत विद्यार्थी :
🥇 प्रथम क्रमांक
🌟 कु. वैष्णवी रविंद्र गाजरे — ९७.८०%
🥈 द्वितीय क्रमांक
🌟 कु. अनुष्का अमोल मगर — ९६.००%
🥉 तृतीय क्रमांक
🌟 कु. आध्या निलेश झावरे — ९५.६०%
यावर्षी तब्बल ९ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवत विशेष कामगिरी केली आहे. तसेच २७ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत. विशेष म्हणजे विद्यालयाच्या इतिहासात प्रथमच गणित विषयात १०० पैकी १०० गुण मिळवणारे दोन विद्यार्थी यंदा घडले आहेत.
विद्यार्थ्यांना प्राचार्य राजेंद्र वाघ सर, परंडवाल सर, म्हस्के सर, वैद्य मॅडम, हासे सर, बेलोटे सर, औटी मॅडम, गाडीलकर सर आणि शिंदे मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. शिवाजीराव जाधव साहेब, सर्व संचालक मंडळ तसेच ग्रामस्थांकडून यशस्वी विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे व विद्यालयाचे अभिनंदन करण्यात येत आहे.









