जामखेड | प्रतिनिधी :
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त जामखेड नगरपरिषदेला “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जामखेड नगरपरिषद” असे नाव देण्यात यावे, या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग माने यांनी गुरुवारपासून नगरपरिषद कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू केले आहे.
हे उपोषण दि. ३१ मे रोजी होणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीपर्यंत सुरू राहणार असल्याची माहिती आंदोलनकर्त्यांकडून देण्यात आली.
जामखेड शहराच्या अस्मितेशी निगडित असलेल्या या मागणीसाठी पांडुरंग माने गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. मात्र, अद्याप प्रशासकीय स्तरावर ठोस निर्णय न झाल्याने त्यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे.
या साखळी उपोषणाला जामखेड शहरातील विविध क्षेत्रांतील पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पाठिंबा दर्शविला.
यावेळी नगरसेवक अरुण जाधव, शिवसेना नेते आकाश बाफना, सोमनाथ राऊत, शिवकुमार डोंगरे, अरुण शिरसाठ, मनोज कुलथे, आप्पासाहेब लोंढे, विकी पिंपळे, दत्ताभाऊ भिसे, महारुद्र नागरगोजे, गणेश गायकवाड, नगरसेवक वासिम सय्यद, सागर सदाफुले, सचिन काशीद, राजू सदाफुले, मुजफ्फर अत्तर, चेतन राळेभात, दत्ता राळेभात, उमेश भोगे, दीपक देशमुख, महेश मासाळ, विकास मासाळ, सचिन मासाळ, विनोद सोनार, रावसाहेब काशीद, कृष्णा अष्टेकर, आशिष डोंगरे, विकास राऊत, अर्जुन निमकर आदी उपस्थित होते.








