• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

जामखेड नगर परिषदेला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याची मागणी; पांडुरंग माने यांचे साखळी उपोषण सुरू

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 25, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
3
VIEWS
Ad 1

जामखेड | प्रतिनिधी

जामखेड नगर परिषदेला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्यात यावे, या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग माने यांनी साखळी उपोषण सुरू केले आहे. नामांतराच्या मागणीसंदर्भात अनेक वेळा निवेदने, पाठपुरावा आणि मागण्या करूनही प्रशासन व लोकप्रतिनिधींकडून ठोस निर्णय होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

RelatedPosts

अकोला विमानतळासाठी राज्य शासनाकडून विशेष निधी; जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू

शासकीय काम करताना कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याचा राजपूत एकता मंचतर्फे तीव्र निषेध

केंद्रीय हिंदी संस्थानच्या नवीकरण अभ्यासक्रमात चेतन जाधव यांचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक

आंदोलकांच्या म्हणण्यानुसार, जामखेड तालुक्याला एक आमदार तसेच विधान परिषदेत दोन आमदारांचे प्रतिनिधित्व असतानाही नगर परिषद नामांतराच्या प्रश्नावर कोणतीही ठोस भूमिका घेतली जात नाही. नगर परिषद नामांतराचा प्रस्ताव प्रलंबित राहण्यामागे विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेचे कारण पुढे केले जात असल्याचा आरोपही आंदोलकांनी केला. तसेच, “आचारसंहिता लागू असताना जिल्हा परिषदेमधील बदल्या कशा होतात?” असा सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला.

सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग माने यांनी सांगितले की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी समाजासाठी केलेले कार्य प्रेरणादायी असून त्यांच्या नावाने नगर परिषदेला ओळख मिळणे ही जामखेडकरांसाठी अभिमानाची बाब ठरेल. मात्र प्रशासनाकडून केवळ आश्वासने दिली जात असून प्रत्यक्ष निर्णय घेतला जात नसल्याने आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

उपोषणस्थळी विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, युवक आणि नागरिकांनी भेट देत आंदोलनाला पाठिंबा दर्शविला. “अहिल्यादेवी होळकरांचे नाव द्या”, “जामखेड नगर परिषद नामांतराचा निर्णय तातडीने घ्या” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.

प्रशासनाने लवकरात लवकर सकारात्मक निर्णय न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही आंदोलकांनी दिला आहे. त्यामुळे या आंदोलनाकडे संपूर्ण जामखेड तालुक्याचे लक्ष लागले असून प्रशासन आणि लोकप्रतिनिधी पुढे कोणती भूमिका घेतात, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

यावेळी ह.भ.प. विधीतज्ञ महारुद्र नागरगोजे, माजी जामखेड ग्रामपंचायत सदस्य रावसाहेब श्रीरामे, माजी संचालक जामखेड कृषी उत्पन्न बाजार समिती सागर सदाफुले, सचिन काशीद, विकी पिंपळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Tags: Amrut Karande
Previous Post

बांधकाम कामगार योजना नावापुरतीच?

Next Post

भरधाव टिप्परच्या धडकेत दोघांचा मृत्यू; महिला गंभीर जखमी

Related Posts

ताज्या घडामोडी

अकोला विमानतळासाठी राज्य शासनाकडून विशेष निधी; जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू

August 23, 2026
6
ताज्या घडामोडी

शासकीय काम करताना कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याचा राजपूत एकता मंचतर्फे तीव्र निषेध

August 23, 2026
4
ताज्या घडामोडी

केंद्रीय हिंदी संस्थानच्या नवीकरण अभ्यासक्रमात चेतन जाधव यांचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक

August 23, 2026
5
ताज्या घडामोडी

संत निरंकारी मिशनच्या रक्तदान शिबिरात ७१६ रक्तदात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान

August 23, 2026
6
ताज्या घडामोडी

Gen Z सोलापूरकर हजारोंच्या संख्येने पुण्यात दाखल; खासदार प्रणिती शिंदे यांच्या उपस्थितीत कार्यक्रमस्थळी सेल्फी

August 23, 2026
5
ताज्या घडामोडी

दर्यापुरात भरला रानभाज्यांचा मेळा; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

August 23, 2026
67
Next Post
भरधाव टिप्परच्या धडकेत दोघांचा मृत्यू; महिला गंभीर जखमी

भरधाव टिप्परच्या धडकेत दोघांचा मृत्यू; महिला गंभीर जखमी

ताज्या बातम्या

पुण्यात निधीच्या मुद्द्यावरून भाजप-राष्ट्रवादी संघर्ष पेटला

August 25, 2026
वननेस वन सेवा – सीझन -६ अंतर्गत वृक्षारोपणाचा पावन कार्यक्रम रहीमाबाद येथे अत्यंत उत्साहपूर्ण व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.

वननेस वन सेवा – सीझन -६ अंतर्गत वृक्षारोपणाचा पावन कार्यक्रम रहीमाबाद येथे अत्यंत उत्साहपूर्ण व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.

August 25, 2026
राष्ट्रीय समाज पक्षाच्या मागणीला अखेर यश!

राष्ट्रीय समाज पक्षाच्या मागणीला अखेर यश!

August 25, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In