भामरागड | प्रतिनिधी
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदावरील १२ वर्षांच्या कार्यकाळानिमित्त केंद्र सरकारने राबविलेल्या विविध विकासकामे, जनकल्याणकारी योजना आणि देशहिताच्या निर्णयांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचे आवाहन भाजपा आदिवासी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी केले.
भामरागड येथे आयोजित भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत मार्गदर्शन करताना डॉ. होळी यांनी केंद्र सरकारच्या विविध योजनांचा प्रचार-प्रसार गावागावांत करण्यावर भर दिला. पायाभूत सुविधा विकास, गरीब कल्याण, आदिवासी विकास, महिला सक्षमीकरण, शेतकरी कल्याण, युवकांसाठी रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी तसेच देशाच्या सुरक्षा आणि आर्थिक प्रगतीसाठी राबविण्यात आलेल्या उपक्रमांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी जनसंपर्क अभियान राबवावे, असे त्यांनी सांगितले.
केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांशी संपर्क साधून त्यांच्या अनुभवांच्या माध्यमातून शासनाच्या कार्याची माहिती अधिक व्यापक स्तरावर पोहोचवावी. समाजातील प्रत्येक घटकापर्यंत विकासकामांची माहिती पोहोचविण्यासाठी कार्यकर्त्यांनी सक्रिय भूमिका घ्यावी, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
बैठकीस दिलीप चलाख, जाधव हालदार, तालुका महामंत्री तपेश हालदार, सम्राट मल्लिक, रमेश गाडगे, माजी नगराध्यक्ष संगीता गाडगे, राकेश बडगे, दिनेश घोसरे, सखाराम भांडेकर, साईराम कोकमुदडीवर, योगेश गोमासे, दिवाकर सडमेक, कमलेश अधिकारी, तपन पाल यांच्यासह भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी आगामी जनसंपर्क अभियानाची रूपरेषा तसेच संघटनात्मक विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
