पेण प्रतिनिधी
पेण तालुक्यातील दिव ग्रामपंचायतीमार्फत दिव गावातील तलावातील गाळ काढण्याचे काम यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आले आहे. तलाव स्वच्छतेनंतर पाण्याचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी संपूर्ण तलाव परिसरात कीटकनाशक पावडरची फवारणी करण्यात आली.
ग्रामपंचायत प्रशासनाने राबविलेल्या या उपक्रमामुळे तलावाची स्वच्छता सुधारण्यास मदत झाली असून नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. विशेषतः पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्याच्या दृष्टीने ही उपाययोजना महत्त्वाची मानली जात आहे.
ग्रामस्थांनी ग्रामपंचायत प्रशासनाच्या कार्याचे कौतुक करत “प्रशासनाचे कोटी कोटी धन्यवाद” अशी भावना व्यक्त केली आहे. तसेच भविष्यातही जनतेच्या हितासाठी अशाच प्रकारची उत्तम विकासकामे व लोकाभिमुख उपक्रम सातत्याने राबवावेत, अशी अपेक्षाही ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात आली आहे.
या कामामुळे तलाव परिसर अधिक स्वच्छ व सुरक्षित झाला असून ग्रामपंचायतीच्या पुढाकाराचे सर्वत्र स्वागत होत आहे.
