वाळुंजनगर प्रतिनिधी :
श्री गणेश चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या सहकार्याने वाळुंजनगर येथे शेतकऱ्यांसाठी बाजरी बियाणे वाटप कार्यक्रम उत्साहात पार पडला. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे परिसरातील शेतकऱ्यांना दर्जेदार बाजरी बियाणे उपलब्ध झाले.
कार्यक्रमास कृषी विभागाचे अधिकारी श्री जोरी साहेब, श्री गवई साहेब आणि श्री मेरके साहेब यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच भैरवनाथ विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमन सौ. रुक्मिणीताई वसंतराव वाळुंज आणि व्हा. चेअरमन श्री तानाजी शेठ पांडुरंग वाळुंज यांच्या हस्ते शेतकऱ्यांना बाजरी बियाण्यांचे वाटप करण्यात आले.
यावेळी वाळुंजनगरचे उपसरपंच श्री बाळासाहेब वाळुंज, श्री गणेश चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष श्री बाळासाहेब देवराम वाळुंज, तंटामुक्ती समितीचे माजी अध्यक्ष श्री गुलाब किसन वाळुंज, ग्रामपंचायतीचे माजी सदस्य श्री दत्तात्रय बबनशेठ वाळुंज तसेच माजी उपसरपंच श्री धोंडीबा विठोबा वाळुंज यांच्या हस्तेही बियाण्यांचे वितरण करण्यात आले.
या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी वेळेवर आणि दर्जेदार बियाणे उपलब्ध झाल्याने समाधान व्यक्त करण्यात आले. उपस्थित शेतकऱ्यांनी कृषीपूरक उपक्रम राबविल्याबद्दल श्री गणेश चॅरिटेबल ट्रस्टचे आभार मानले.
