प्रतिनिधी :
ग्रामीण भागातील वंचित, शोषित, पीडित, अपंग, वृद्ध, विधवा तसेच सुशिक्षित बेरोजगार युवक-युवती, महिला व पुरुष यांना रोजगार व उद्योगाच्या माध्यमातून आत्मनिर्भर बनवण्यासाठी ग्रामीण रोजगार व उद्योजक निर्मिती प्रशिक्षण मंडळ (महाराष्ट्र राज्य) यांच्या वतीने राज्यभर विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे.
या उपक्रमाचा मुख्य उद्देश सर्वसामान्य लोकांची आर्थिक स्थिती मजबूत करणे, आत्मविश्वास वाढविणे आणि “गाव तिथे उद्योग, घर तिथे रोजगार” ही संकल्पना प्रत्यक्षात आणणे हा आहे. यासाठी महाराष्ट्रातील विविध जिल्हे, तालुके आणि गावांमध्ये प्रशिक्षण देऊन रोजगार निर्मिती व उद्योग निर्मिती करण्याचा संकल्प मंडळाने केला आहे.
या अंतर्गत खालील समित्या स्थापन करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे :
१) जिल्हानिहाय स्थानिक देखरेख समिती
२) तालुकानिहाय स्थानिक देखरेख समिती
३) गावनिहाय स्थानिक देखरेख समिती
तसेच विविध उपसमित्यांची स्थापना देखील करण्यात येणार आहे.
ग्रामीण रोजगार निर्मिती व उद्योजक निर्मिती प्रशिक्षण मंडळाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील बेरोजगार युवक-युवतींना प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि उद्योग उभारणीसाठी मदत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
ज्यांना या समित्यांमध्ये सहभागी व्हायचे आहे किंवा अधिक माहिती हवी आहे त्यांनी खालील क्रमांकावर संपर्क साधावा :
महाराष्ट्र समन्वयक :
श्री. एन. एम. भोजने सर – ७४९८९६७५१७
उद्योग प्रशिक्षक :
डॉ. पंजाबराव खाडे – ८८०६३५६५९५
