
प्रतिनिधी किरण पाठक , अंमळनेर
अमळनेर : विद्यापीठस्तरीय तिसरे बहिणाबाई विद्यार्थी साहित्य संमेलनाचे आयोजन कबचौउमवि संचलित, प्रताप तत्वज्ञान केंद्र,अमळनेर येथे सोमवार,दि. १० मार्च २०२५ रोजी आयोजित करण्यात आले होते यावेळी पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय,अमळनेर चा विद्यार्थी सागर सुकदेव कोळी यांने बोलीभाषा स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला*
यावेळी सागर ला सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी समारोप व बक्षीस वितरण प्रसंगी कबचौउमवि चे व्यवस्थापन परिषद सदस्य व कार्याध्यक्ष अँड.अमोल पाटील,प्रताप तत्वज्ञान केंद्राचे सल्लागार समिती सदस्य दिनेश नाईक, मानद संचालक प्रा.डॉ.एस.डी.ओस्तवाल,व्यवस्थापन परिषद सदस्य नितीन झाल्टे,विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.विनोद पाटील,विद्यार्थी विकास विभागाचे संचालक प्रा.डाॅ.जयेंद्र लेकुरवाळे, जिल्हा समन्वयक प्रा.डाॅ.संजय पाटील उपस्थित होते.. व सागर च्या या यशा बद्दल महाविद्यालयाचे चेअरमन अभिजीत भांडारकर, प्राचार्य डॉ.पी.एस पाटील,प्रा.डाॅ. अस्मिता सरवैया, प्रा.डाॅ.विजयकुमार वाघमारे, प्रा.डाॅ.जगदीश सोनवणे, प्रा.डाॅ.डी आर ढगे, प्रा.डाॅ.अनिता खेडकर, प्रा.डाॅ.श्वेता वैद्य, प्रा.डाॅ.सागरराज चव्हाण ,प्रा.डाॅ. भरत खंडागळे सर्वांनी सागर चे अभिनंदन केले..
Discussion about this post